११ वी – १२ वी सायन्स पेक्षा
डिप्लोमा (Diploma) करून Engineering
करणे का सोपे आणि फायदेशीर आहे?
१. Introduction (प्रस्तावना)
- शिक्षणातील १० वीचे
वर्ष म्हणजे
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा Turning
Point असतो. १० वी झाल्यावर पुढे काय करायचे?
हा विद्यार्थी तसेच पालकांसमोर
पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात Engineering करायचे
आहे, ते बहुतांश वेळा डोळे झाकून 11th Science ला Admission
घेतात. बऱ्याच
पालकांना आणि विद्यार्थ्यांना असे वाटते की, फक्त १२ वी Science च्या Marks वर पुढे Engineering ला Admission मिळते. परंतु, Engineering च्या Admission साठी लागणाऱ्या MHT-CET
व IIT-JEE सारख्या स्पर्धा परीक्षांच्या (Entrance Exams) कठीण
पातळीबद्दल (Difficulty Level) त्यांना पूर्वकल्पना नसते. योग्य माहिती
नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा व पालकांचा ११ वी Science ला जाण्याचा निर्णय पुढे जाऊन
चुकीचा ठरू शकतो. - या सर्व मानसिक ताणावर आणि कठीण स्पर्धा
परीक्षांवर एक उत्तम पर्याय ठरू शकतो, तो म्हणजे Polytechnic
Diploma. Diploma क्षेत्रात
११ वी–१२ वीच्या तुलनेत कमी स्पर्धा (Competition)
आहे. तसेच, Diploma पूर्ण केल्यावर Engineering च्या थेट द्वितीय वर्षात, म्हणजेच Direct
Second Year (Lateral Entry) मध्ये
सहज प्रवेश मिळतो. १०
वी नंतर कमी
खर्च आणि कमी स्पर्धा असलेला हा Diploma चा मार्ग Engineering करण्यासाठी कसा उत्तम आणि फायदेशीर पर्याय
ठरू शकतो, याबाबतची
मुद्देसूद चर्चा आपण या लेखात करणार आहोत.
२. थेट इंजिनिअरिंगचा पाया (Core
Technical Base)
- अकरावी–बारावी Science मध्ये General विषय शिकवले जातात, जसे की Physics,
Chemistry, Mathematics, Biology. हे
विषय Engineering साठी
आवश्यक आहेत, परंतु
त्यांचा थेट Engineering शी
संबंध नाही. दोन वर्षे Students फक्त Theoretical Knowledge, म्हणजेच Theorems, Formulas आणि Numerical Solving यामध्ये घालवतात. याउलट,
Diploma मध्ये पहिल्या वर्षापासूनच
तुम्हाला आवडीची शाखा निवडण्याचा पर्याय असतो, जसे की Computer,
Mechanical, Civil, Electrical, Electronics and Communication इत्यादी. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या
वर्षापासूनच Technical Knowledge मिळते. - Diploma
च्या K-Scheme
नुसार Marking System मधील 65 ते 70% Weightage हे Practical Activities ला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ Hands-on Experience घेण्यामध्ये
जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली Technical
Skills विकसित होतात. - Workshop
Practice सारख्या
विषयांमध्ये मुले स्वतःच्या हाताने काम करून शिकतात. Engineering
Drawing या Subject मध्ये मुले Engineering ला लागणारे Drawing Diploma Level लाच शिकून घेतात. Computer Programming या Subject मध्ये Students C, Java, Python
सारख्या Languages शिकतात. Diploma च्या
विद्यार्थ्यांना 12 आठवड्यांचे Industrial Training असते. यामध्ये विद्यार्थी स्वतः 12 आठवडे एखाद्या कंपनीमध्ये जाऊन कामाचा अनुभव
घेतात. या सगळ्यांमुळे त्यांचा Engineering चा
पाया अगदी मजबूत होतो. - जेव्हा Diploma चे विद्यार्थी Lateral
Entry द्वारे Engineering
च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवतात,
तेव्हा त्यांना त्यांच्या Branch
चे सर्व Fundamental
Knowledge आधीच
आलेले असते. त्यामुळे हे विद्यार्थी Practical
Knowledge मध्ये
अकरावी–बारावी करून आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असतात.
३. परीक्षेचे दडपण आणि स्पर्धा
परीक्षांची चिंता (No JEE/CET Tension )
- अकरावी–बारावी केल्यानंतर Engineering
च्या प्रवेशासाठी CET किंवा
JEE Exam द्यावी
लागते. त्यामध्ये चांगले Percentile (90 किंवा त्यापेक्षा जास्त) मिळाले,
तरच तुम्हाला चांगल्या College
ला प्रवेश मिळतो. Engineering
ला Admission घेताना बारावीच्या Percentage ला विशेष महत्त्व नसते. CET तसेच JEE
या परीक्षा Objective Type तसेच
Problem-Solving Based असल्यामुळे
बारावीला चांगले Percentage मिळालेल्या
मुलांनाही या परीक्षांमध्ये कमी Score मिळाल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला
पाहायला मिळतात. - बारावीची Board Exam ही Theoretical
Based असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना
Board Exam चा व या Competitive Exams चा
वेगवेगळा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर
दुहेरी ताण येतो. याउलट, Diploma करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या
वर्षाच्या Marks वर Engineering
ला Admission मिळते. त्यांना कोणतीही वेगळी Exam द्यावी लागत नाही. त्यामुळे Engineering
ला प्रवेश घेणे त्यांना सोपे
जाते आणि त्यांना वेगळ्या प्रवेश परीक्षेचा मानसिक ताण येत नाही.
४. कमी खर्च कमी स्पर्धा (Less Expenses Less compition)
- अकरावी–बारावीच्या
Colleges मध्ये Board Exam ची
तयारी करून घेतली जाते. Board Exam चा
चांगला निकाल लावणे हे Science Colleges चे उद्दिष्ट असते. त्यामुळे Science
Colleges मध्ये CET
व JEE Exam ची तयारी करून घेतली जात नाही. त्यामुळे पुढील Engineering च्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवण्याकरता
विद्यार्थ्यांना बाहेर Coaching Classes किंवा Academy Join करावी लागते. अशा Coaching Classes ची Fee दोन लाखांपासून ते आठ लाखांपर्यंत आहे. अशा Classes
मुळे विद्यार्थ्यांच्या
पालकांवर आर्थिक
बोजा पडतो. - याउलट, Diploma च्या तिसऱ्या वर्षाच्या Board Exam च्या Marks वर विद्यार्थ्यांना Engineering ला Admission मिळते. त्यामुळे त्यांना कोणतेही Separate Tuition Classes लावावे लागत नाहीत. त्यामुळे Diploma
करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
पालकांवर आर्थिक बोजा पडत नाही. तसेच Diploma करणाऱ्या विविध समाजांतील विद्यार्थी व
विद्यार्थिनींकरता महाराष्ट्र शासनाच्या खूप साऱ्या Scholarships
असतात. तसेच महाराष्ट्र शासनाने
मुलींकरता शिक्षण
शुल्क माफ केल्यामुळे
मुलींचे अगदी कमी खर्चात Diploma चे
शिक्षण पूर्ण होते. विद्यार्थ्यांना Government
Polytechnic Colleges मध्ये Admission
मिळाल्यास Hostel ची Fee सुद्धा नगण्य असते. त्यामुळे मध्यमवर्गीय
कुटुंबातील विद्यार्थ्यांना Diploma
Engineering हा खूप
परवडण्यासारखा पर्याय आहे. - दरवर्षी महाराष्ट्रातून 16 ते 18
लाख विद्यार्थी CET Exam
देतात. त्यामुळे CET देऊन Engineering ला जाण्याकरता खूप मोठी स्पर्धा असते. याउलट,
दरवर्षी 80
हजार ते एक लाख विद्यार्थी Diploma
करून बाहेर पडतात. त्यामुळे Diploma
मार्गे Engineering ला जाण्याकरता खूपच कमी स्पर्धा असते.
५. करिअरच्या लवकर आणि दुहेरी संधी (Early
Job Opportunities )
- १२ वी सायन्स नंतर नोकरीच्या थेट संधी नसतात,
पुढे डिग्री करणे बंधनकारक
असते. बारावी
Science झाल्यानंतर
थेट नोकरीच्या संधी उपलब्ध नसतात. तुम्हाला Degree
करणे बंधनकारक असते. याउलट,
Diploma पूर्ण
केल्यानंतर तुम्हाला
विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच तुम्ही स्वतःचा
उद्योग सुरू
करू शकता. - Indian
Railways मध्ये
अनेकदा Diploma धारकांसाठी Recruitment निघतात.
महाराष्ट्र शासनाच्या महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि महानगरपालिका या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच
विद्यार्थी Third Year मध्ये असताना विविध कंपन्या Diploma
Colleges मध्ये येऊन विद्यार्थ्यांची Campus Recruitment करतात.
६. वेळेची बचत आणि विषयांची समानता (Time
Saving & Syllabus Match)
- अकरावी–बारावीची दोन वर्षे व Engineering ची चार वर्षे, अशी Degree पूर्ण होईपर्यंत एकूण सहा वर्षे लागतात. Diploma
केल्यास Diploma ची तीन वर्षे व Engineering ला Direct
Second Year ला Admission
मिळाल्यामुळे त्याची तीन वर्षे,
अशी एकूण सहा वर्षे लागतात. त्यामुळे Diploma केल्यास कोणताही अतिरिक्त वेळ वाया जात नाही. याउलट,
Diploma केल्यामुळे विद्यार्थ्यांचा
आपल्या Branch विषयाचा पाया भक्कम झालेला असतो. त्यामुळे त्यांना Direct
Second Year ला गेल्यावर तेथील अभ्यासक्रम
सोपा जातो.
७. Conclusion (निष्कर्ष)
- दहावीनंतर
ज्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुढे Engineering
करायचे हे ठरलेले आहे,
त्यांच्यासाठी Diploma हा Science
पेक्षा कधीही आर्थिकदृष्ट्या
फायदेशीर व मानसिक ताण कमी करणारा पर्याय आहे. विद्यार्थी व पालकांनी
CET व JEE
च्या Percentile च्या मागे धावण्यापेक्षा Practical Skills वर
लक्ष दिले, तर
तुम्हालाही Diploma हा
पर्याय योग्य वाटेल. - तुम्ही कोणता पर्याय निवडत आहात, ते मला Comment
मध्ये नक्की कळवा.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून
शुभेच्छा!
Leave a Reply